Skip to main content

पुस्तक परिचय : The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional लेखक : Anurag Bhaskar


 

पुस्तक परिचय : The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional
लेखक : Anurag Bhaskar
प्रकाशक : Penguin Viking
पृष्ठे : ४००
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेतस्थळ :

आज भारतीय समाजाचे बऱ्याच अंशी राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येते. अशा वेळी भारतीय संविधानात सांगितलेली चार तत्त्वे म्हणजे न्यायसमानतास्वातंत्र्य आणि बंधुत्व पूर्णपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे वाटू लागले आहे. कारण ही तत्त्वे स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीयसामाजिक आणि आर्थिक सुधारण्याच्या प्रक्रियेला प्रगतिशील दिशा देतात. म्हणूनच ही तत्त्वे समजून घेण्यासाठी The Foresighted Ambedkar: Ideas That Shaped Indian Constitutional हे अनुराग भास्कर यांनी इंग्रजीत लिहिलेले पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

हे पुस्तक अंतर्दृष्टीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असून ते डॉ. आंबेडकरांना दूरदर्शी नेते म्हणून अधोरेखित करते आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीत त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सखोल अभ्यास मांडते. भारतीय राज्यघटनेचा विचार करताना आपण घटनासभामसुदा समिती आणि २६ जानेवारी १९५० या ऐतिहासिक क्षणाकडे संविधानाचे अंतिम स्वरूप म्हणून पाहतो. परंतु राज्यघटना ही एका दिवसात किंवा एका सभागृहात जन्मलेली कल्पना नाहीती संघर्षअनुभवविचार आणि सामाजिक असमानतेविरुद्धच्या लढ्यांतून घडलेली ऐतिहासिक प्रक्रिया आहे. याच प्रक्रियेचा मागोवा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनात्मक दूरदृष्टीचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.

पुस्तकाची सुरुवात आंबेडकरांच्या बालपणापासून आणि शिक्षणापासून होतेपरंतु हे वर्णन केवळ माहितीपर राहत नाही. लेखक दाखवतो की जातीय भेदभावाचा अनुभवकोलंबिया व लंडनमधील शिक्षणआणि अर्थशास्त्र-राजकारणातील अभ्यास यांमुळे आंबेडकरांच्या मनात राज्यरचनाप्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय या प्रश्नांबद्दल गंभीर विचार रुजला. लेखक नमूद करतो की १९१९ पासूनच्या वसाहती घटनासुधारणांच्या चर्चेत आंबेडकर सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यघटनेचे तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खूप आधीपासून विकसित होत होते. हा दृष्टिकोन पुस्तकाचा बौद्धिक वैशिष्ट्य ठरतो. डॉ. आंबेडकरांना केवळ मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नव्हेतर भारतीय घटनाविचाराच्या दीर्घ प्रवाहातील सातत्यपूर्ण हस्तक्षेपक म्हणून पाहण्याची दृष्टी लेखक देतो.

लोकशाहीविषयी आंबेडकरांची व्यापक संकल्पना कशी होती हा महत्त्वाचा मुद्दा लेखकाने स्पष्टपणे मांडला आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा प्रारंभ असला तरी तिचा आत्मा सामाजिक समतेत आहेअसे आंबेडकरांचे मत होते. जर स्वातंत्र्यसमता आणि बंधुता ही मूल्ये सामाजिक व्यवहारात उतरली नाहीततर राजकीय लोकशाही टिकणार नाहीहा त्यांचा इशारा आजही तितकाच अर्थपूर्ण वाटतोअसे हे पुस्तक सांगते. लेखक या विचाराला राज्यघटनेतील मूलभूत हक्कसामाजिक न्यायाच्या तरतुदी आणि आरक्षण धोरणाशी जोडून स्पष्ट करतात.

या पुस्तकात आंबेडकरांचा अजून एक महत्त्वाचा इशारा नमूद केला आहे. बहुसंख्याकांच्या संख्याबळावर चालणाऱ्या लोकशाहीतील संभाव्य धोका म्हणून त्यांनी न्यायालयीन पुनरावलोकनसंघराज्य रचनामूलभूत हक्क आणि वंचितांसाठी प्रतिनिधित्व या घटकांना घटनात्मक संरक्षण देण्याचा आग्रह धरला होता. गोलमेज परिषदांपासून घटना सभेतील चर्चांपर्यंत त्यांच्या भूमिकेत दिसणारे सातत्य दाखविताना लेखकाने हे स्पष्ट केले आहे की आंबेडकरांचे विचार केवळ प्रतिक्रियात्मक नव्हतेतर ते एक सुसंगत घटनात्मक तत्त्वज्ञान होते.

हे पुस्तक अनेक उल्लेखनीय पैलूंवर नवा प्रकाश टाकते आणि काही प्रचलित गैरसमजांवर ठोस टीका करते. उदाहरणार्थआंबेडकरांनी संविधान जाळण्याची भाषा का वापरलीआरक्षणाचा कालावधी कसा समजायचाकिंवा त्यांनी काही मुद्द्यांवर केलेले तडजोडीचे निर्णय कोणत्या राजकीय संदर्भात होतेया सर्व प्रश्नांवर लेखक ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे पुरावे देत गैरसमजांचे खंडन करतो. यामुळे आंबेडकरांचे विचार घोषणांमध्ये किंवा प्रतीकांमध्ये अडकून न राहता त्यांच्या मूळ तात्त्विक आणि राजकीय संदर्भात समजण्यास मदत होते. वैचारिक वाचकांसाठी हा भाग विशेष उपयुक्त ठरतो.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीविषयी सार्वजनिक चर्चेत काही गैरसमज आजही दिसतात. त्यापैकी एक म्हणजे B. N. Rau यांनी संविधान लिहिले अशी समजूत सोशल माध्यमांतून पसरताना दिसते. प्रत्यक्षात राऊ हे मसुदा समितीचे घटना सल्लागार होते. ते संविधान सभेचे सदस्य नसल्याने त्यांनी सभेतील चर्चांमध्ये भाग घेतला नव्हतापरिणाम कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली डिबेट्सच्या १२ खंडांत त्यांचे एकही भाषण आढळत नाही. त्यांनी विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून प्राथमिक टिपणेतुलनात्मक संदर्भ आणि सैद्धांतिक आराखडा तयार केला.

परंतु त्या आराखड्याला भारतीय सामाजिक-राजकीय वास्तवाशी सुसंगत घटनात्मक रूप देण्याचे कार्य मसुदा समितीनेविशेषतः अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनासभेतील चर्चांमधून पूर्ण केले. हा फरक लक्षात घेतल्यास ही राज्यघटना बनविताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वाचे योगदान समजून येते. हे वाचताना लेखक अनुराग भास्कर यांच्या पुस्तकाचा एक अप्रत्यक्ष परिणाम असा जाणवतो की ते राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करते.

आंबेडकरांनी मांडलेली संविधानिक नैतिकता” ही संकल्पना पुस्तकात प्रभावीपणे उलगडते. राज्यघटनेचा आत्मा केवळ कलमांमध्ये नसतोतो नागरिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या वर्तनात असतोहे आंबेडकरांचे मत लेखक उदाहरणांसह मांडतो. त्याचप्रमाणे संविधान कितीही प्रगत असले तरी ते चालवणारा समाज जर असमानतेला मान्यता देत असेलतर लोकशाही दुर्बल होतेहा आंबेडकरांचा संदेश भाषणे आणि ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे प्रभावीपणे मांडला आहे. आजच्या काळातील संस्थांवरील प्रश्नसार्वजनिक चर्चेतील ध्रुवीकरण आणि सामाजिक विषमता पाहता हा विचार अधिकच समकालीन वाटतो.

आज भारतात राज्यघटनानागरिकत्वसामाजिक न्यायसंघराज्य आणि लोकशाहीच्या स्वरूपावर नव्याने चर्चा सुरू आहे. अशा वेळी आंबेडकरांच्या मूळ घटनात्मक चिंतनाचा मागोवा घेणारे हे पुस्तक विशेष अर्थपूर्ण ठरते. हे पुस्तक वाचताना जाणवते की आंबेडकरांसाठी राज्यघटना ही केवळ कायदेशीर चौकट नव्हतीती सामाजिक परिवर्तनाची राजकीय रूपरेषा होती. लोकशाही टिकवण्यासाठी संस्थात्मक रचना पुरेशी नसून सामाजिक समतानैतिक जबाबदारी आणि विवेकशील नागरिकत्व आवश्यक आहे. हा त्यांचा संदेश आजही तेवढाच महत्वाचा आहे.

‘The Foresighted Ambedkar  
हे पुस्तक डॉ. आंबेडकर अभ्यासातील महत्त्वाची भर आहे. ते त्यांना एका ऐतिहासिक क्षणापुरते मर्यादित न ठेवता भारतीय घटना विचारांच्या दीर्घ प्रक्रियेतील केंद्रस्थानी ठेवते. वैचारिक दृष्टीकोनातून पाहिले तर हे पुस्तक आणि त्यावरील हे परीक्षण एका मूलभूत जाणिवेकडे नेते. भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून सामाजिक न्यायाच्या स्वप्नाची राजकीय रचना आहेआणि त्या स्वप्नाला आकार देणाऱ्या आंबेडकरांची दूरदृष्टी समजून घेणे म्हणजे भारतीय लोकशाहीच्या आत्म्याला समजून घेणे होय.

पुस्तकाची भाषा शैक्षणिक असूनही प्रवाही आहे. इतिहासकायदा आणि राजकीय सिद्धांत यांचा संगम असलेले हे लेखन अभ्यासकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ ठरतेतसेच सामान्य वैचारिक वाचकालाही समजण्यास सोपे आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व भारतीयांनी वाचावे असे वाटते.

हे पुस्तक मराठीतही उपलब्ध असून त्याचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी उत्तमरीत्या केला आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...