शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्रमांक: २१७ विषय क्रमांक: ४ विषय: सत्यमेव जयते (दीर्घ लेख) परीक्षक: मा. सौ. माधुरीताई वानखडे शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई संकेतस्थळ: सत्यमेव जयते हे भारतीय राष्ट्राचे ब्रीद वाक्य आहे, असे आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो आहे. वास्तविक बघायला गेले तर हे संस्कृत भाषेतील वाक्य असून केवळ सत्याचाच विजय होतो असा त्याचा अर्थ आहे. या वाक्याचे मूळ मुंडकोपनिषदातील ३.१.६ या श्लोकामध्ये आहे. संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला हा श्लोक असा आहे, “सत्यमेव जयते नानृतं, सत्येन पन्था विततो देवयानः। येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा, यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ||”. याचा मराठीत अर्थ आहे, “केवळ सत्याचाच विजय होतो; असत्याचा नाही. सत्याच्या माध्यमातूनच तो दिव्य मार्ग विस्तारलेला आहे, ज्याद्वारे ज्या ऋषीमुनींच्या इच्छा पूर्णपणे तृप्त झाल्या आहेत, ते सत्याच्या त्या सर्वोच्च खजिन्यापर्यंत पोहोचतात.” म्हणजे थोडक्यात सांगायचे तर सत्य जिंकते, पण असत्य नाही. जेव्हा आपण सत्यमेव जयते हे वाक्य आपल्या शालेय पुस्तकांपासून सरकारी कागदपत्रांपर्यंत, न्यायालयांच्या शिक्क्यांपासून चल...