Skip to main content

पुस्तक परिचय The Karamazov Brothers

 


विषय : पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : द ब्रदर्स कारमाझोव्ह (The Brothers Karamazov)
लेखक : फ्योदोर दोस्तॉयवस्की  (Fyodor Dostoevsky)
इंग्रजी भाषांतर : कॉन्स्टन्स गार्नेट (Constance Garnett)
प्रकाशक : OM Book International
पृष्ठे : ८८०
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेतस्थळ :

आजचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. या युगातील अनेक तरुणांना लघुलेख आणि संक्षिप्त मजकूर वाचण्याची सवय आहेप्रदीर्घ लेखनासाठी वेळ किंवा संयम कमी पडतो. अशा वेळी फ्योदोर दोस्तॉयवस्की यांची सुमारे ९०० पानांची द ब्रदर्स कारमाझोव्ह’ ही कादंबरी वाचावीअसे सांगणे काहीसे कठीण वाटते. तरीही मला ठामपणे वाटते की वयाची एकवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही माणसाने ही कादंबरी कोणतीही पूर्वअट न ठेवता वाचली पाहिजे. कारण ही केवळ कथा नसून देवस्वातंत्र्याची इच्छानैतिकता आणि मानवी जबाबदारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर गंभीर चिंतन करणारे तात्त्विक महाकाव्य आहे.

स्वतःचे वेगळेपण जपायचे असेलविचारांची स्वतंत्र दिशा घडवायची असेलतर उत्तम आणि प्रदीर्घ साहित्य वाचणे आवश्यक असते. त्या दृष्टीने द ब्रदर्स कारमाझोव्ह’ आपल्याला वास्तवाचा अर्थ लावण्याची बौद्धिक ताकद देते. आपल्याला अपेक्षित असलेली परिस्थिती आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये दरी असतेपण आपण जर त्या दरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेतर व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली कोणतीही राजकीय-सामाजिक व्यवस्था कोसळण्याची शक्यता निर्माण होतेहा सूक्ष्म इशारा ही कादंबरी देते.

१८८० साली रशियन भाषेत प्रकाशित झालेली ही दोस्तॉयवस्की यांची अखेरची आणि सर्वाधिक परिपक्व कलाकृती मानली जाते. कारमाझोव्ह कुटुंबाच्या कथानकाभोवती विणलेली ही कादंबरी मानवी अंतःकरणातील श्रद्धा-अश्रद्धाअपराधभावनान्याय-अन्याय आणि मोक्ष-भ्रंश यांच्या सीमारेषांचा शोध घेते. ती केवळ कुटुंबकथा नसून मानवी आत्म्याच्या संघर्षाचा विस्तीर्ण पट उलगडते.

कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेले कारमाझोव्ह कुटुंब हे समाजाचे रूपक आहे. वडील फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह हे स्वार्थविकृती आणि नैतिक अधःपतनाचे प्रतीक आहेत. दोन विवाह केलेलेदोन्ही पत्नी दिवंगतआणि जीवनाकडे बेफिकीरस्वैर दृष्टीने पाहणारा हा मनुष्य आजच्या सार्वजनिक जीवनातील अनेक व्यक्तींशी साधर्म्य दाखवतो की जे सत्तापैसा आणि अहंकाराच्या जोरावर नैतिकतेला तिलांजली देतात. राज्यघटना वा मूल्ये यांच्याकडे ते आदराने नव्हेतर स्वतःच्या सोयीने पाहतात.

फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह याला तीन पुत्र आहेत. ही तीन मुले म्हणजे समाजातील तीन प्रवृत्ती असल्याचे दाखविले आहेत. दिमित्री हा सर्वात मोठा पण फ्योदोर पावलोविचला पहिल्या बायको पासून झालेला मुलगा २८ वर्षाचा असून भावनांच्या भरात पेटणारासंतापाने निर्णय घेणारा नागरिक आहे. दुसरा मुलगा इव्हान २४ वर्षाचा तर तिसरा मुलगा अल्योशा २१ वर्षाचा आहे. ही दोन्ही मुले फ्योदोर पावलोविचला दुसऱ्या बायकोपासून झालेली मुले आहेत. इव्हान हा तर्कशुद्ध पण निराशप्रश्न विचारणारा पण कृती न करणारा मध्यमवर्गीय मनुष्य आहे आणि अल्योशा हा मूल्यकरुणा आणि संविधानिक नैतिकतेवर विश्वास ठेवणारा दुर्मिळ नागरिक आहे.

फ्योदोर पावलोविच कारमाझोव्ह याच्या तीनही मुलांमध्ये संपत्तीप्रेम आणि मत्सर यामुळे संघर्ष होत असतो आणि शेवटी वडिलांचा खून होऊन कुटुंबात मोठा गोंधळ निर्माण होतो. खुनाचा आरोप दिमित्री पावलोविच वर आलेला असतो. तो खरा निर्दोष असतो आणि जगाला सांगत असतो की त्याचा वडिलांवर राग जरूर असतो पण त्याने हा खून केलेला नाही. हे त्याच्या दोन्ही भावांना सुद्धा माहिती असते. पण तेथील समाज त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. इथे लेखक अपराधाला केवळ गुन्हेगारी कृती पुरते मर्यादित ठेवत नाही. लेखकाच्या म्हणण्यानुसार खून कोणी केला?” हे महत्वाचे नसूनमाणूस चुकीच्या मार्गाने का जाऊ लागतोहे समजून घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी लेखक म्हणतो की अपराध हा मौनातूनही जन्मतो आणि द्वेषदुर्लक्षअसंवेदनशीलता हे या अपराधाचे स्वरूप आहे.

श्रद्धा आणि संशय यातील संघर्ष ही कादंबरीची मध्यवर्ती रेषा आहे. अल्योशा देव आणि माणुसकीवर विश्वास ठेवतोतर इव्हान देवाच्या न्यायावर प्रश्न उपस्थित करतो. इव्हानचे प्रसिद्ध वाक्य आहे, “जर देव नसेलतर सर्व काही परवान्याचे आहे.” हे वाक्य पुस्तक वाचून संपवल्यानंतर सुद्धा विसरू शकत नाही. कारण हा प्रश्न फक्त देवाचा नसूनतर नैतिकतेचा आहे. जर नियम नसतीलमूल्ये नसतीलअंतःकरण जागे नसेलतर माणूस कुठे जाईलआजच्या जगात जेव्हा पैसासत्ताप्रसिद्धी हेच अंतिम सत्य बनतेतेव्हा हे वाक्य अधिक भयानक वाटते.

या पुस्तकातील द ग्रँड इन्क्विझिटर” हा भाग जागतिक साहित्याच्या इतिहासात फार महत्वाचा मानला जातो. येथे प्रश्न विचारला गेला आहे की माणसाला खरेच स्वातंत्र्य हवे असते काकी सुरक्षित गुलामगिरीहा विचार धार्मिक चौकटीपलीकडे जाऊन सामाजिक आणि राजकीय संदर्भातही अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेकदा स्वातंत्र्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा सोयीचे बंधन माणूस गुलामगिरी पसंत करतो आणि ही जाणीव अस्वस्थ करणारी आहे.

लेखक फ्योदोर दोस्तॉयवस्की प्रत्येक पात्राची मानसशास्त्रीय गुंतागुंत समर्थपणे उलगडतात. येथे कोणी पूर्णतः चांगले किंवा पूर्णतः वाईट नाही. स्मेर्द्याकोव्हझोसिमाग्रुशेंका यांसारखी पात्रेही मानवी मनाच्या विविध छटा समोर आणतात. त्यामुळे ही कादंबरी कथा न राहता आत्मपरीक्षणाचा जिवंत दस्तऐवज बनते.

द ब्रदर्स कारमाझोव्ह ही कादंबरी केवळ रशियन समाजाचे चित्र नसूनते कोणत्याही लोकशाही समाजासाठी एक महत्वाचा आरसा आहे. सामाजिक विषमताजातीय व धार्मिक ध्रुवीकरणराजकीय प्रचाराचे आक्रमणसत्याचे विस्थापनमूल्यांची माघार या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आपल्याला अधिकच महत्वाची वाटते कारण ती सांगते की समाजाचा खरा प्रश्न सत्ता नाहीसमाजाचा खरा प्रश्न नैतिकता आहे. म्हणून ही कादंबरी विचारते, “आपण कोण आहोत?” दिमित्रीचे आवेगइव्हानचा संशयकी अल्योशाची करुणा?, ही कादंबरी पुढे म्हणते की समाजाचा खून केवळ माणसाचा नसतो. तो मूल्यांचा असतो. तो आत्म्याचा असतो. म्हणूनच द ब्रदर्स कारमाझोव्ह ही कादंबरी आजच्या काळात केवळ साहित्यिक महानता नाहीतर नैतिक आणि सामाजिक आत्मपरीक्षणाची गरज बनते.

कादंबरीतील एक महत्त्वपूर्ण संदेश विशेष उल्लेखनीय आहे: स्वतःशी खोटे बोलू नका.” जो मनुष्य स्वतःशीच असत्य वागतोत्याला शेवटी सत्य ओळखण्याची क्षमता गमवावी लागते. आदर नष्ट झाला की प्रेमही नष्ट होतेआणि प्रेम नसताना माणूस विकारांकडे झुकतो. म्हणून स्वतःचे आत्मपरीक्षण करत राहणेखोटेपणापासून दूर राहणे आणि भीतीवर मात करणेहा या कादंबरीचा जीवन दृष्टिकोन आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की द ब्रदर्स कारमाझोव्ह’ ही कादंबरी केवळ साहित्यिक महानता नाहीतर मानवी आत्म्याचे तात्त्विक महाकाव्य आहे. स्वतःसाठी वेळ काढा आणि ही कादंबरी अवश्य वाचाकारण ती आजच्या काळात आपल्याला जग समजण्यापूर्वी स्वतःला समजून घेण्याची शिकवण देते.

धन्यवाद,
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...