Skip to main content

पुस्तक परिचय राजकारण जिज्ञासा लेखक सुहास पळशीकर


 

विषय: पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव: राजकीय जिज्ञासा
लेखक: सुहास पळशीकर
प्रकाशक: साधना प्रकाशन
पृष्ठये: १९६
शब्दांकन: योगेश गोगवेकर
संकेत स्थळ: 

भारतीय लोकशाही ही केवळ बहुमताची सत्ता नसून ती संविधानाने मर्यादित केलेली व्यवस्था आहे. बहुमताला अधिकार आहेत, पण त्या अधिकारांना मूलभूत हक्कांची बंधने आहेत. बहुमताच्या नावाखाली अल्पसंख्याकांचे अधिकार पायदळी तुडवले गेले, तर लोकशाहीचा आत्मा हरवतो. याचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी सुहास पळशीकर यांचे राजकीय जिज्ञासा हे पुस्तक वाचले पाहिजे.

जेव्हा सुहास पळशीकर या पुस्तकात लोकशाही ही केवळ निवडणुकीची प्रक्रिया नसून एक संविधानिक संस्कृती आहे असे सांगतात, तेव्हा एका गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे सुहास पळशीकर हे भारतीय राजकारणाचे केवळ विश्लेषक नसून, ते लोकशाहीचे गंभीर अभ्यासक आणि संविधानिक चौकटीचे चिकित्सक भाष्यकार आहेत. भारतीय पक्षव्यवस्था, निवडणूक राजकारण, लोकमत, आणि बदलत्या सामाजिक संदर्भातील लोकशाही संस्थांचे कार्य यांचा त्यांनी सातत्याने अभ्यास केलेला आहे.  

लोकशाही म्हणजे नेमके काय? लोकशाही केवळ बहुमताने चालणारी सत्ता आहे का? नागरिक म्हणजे फक्त मतदार आहे का? संविधान ही केवळ पुस्तकातली चौकट आहे का? राजकारण या शब्दाचा नेमका अर्थ काय? अशा मूलभूत प्रश्नांची जाणीव करून देणारे आणि राजकारणाकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची गरज "राजकारण जिज्ञासा" या पुस्तकात आहे.

आजच्या सार्वजनिक जीवनात “राजकारण” हा शब्द अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरला जातो. राजकारण म्हणजे पक्षीय डावपेच, आरोप-प्रत्यारोप किंवा भ्रष्टाचाराची गोष्ट, अशीच प्रतिमा समाजमनात तयार झाली आहे. परिणामी राजकारणाविषयी उदासीनता आणि अविश्वास वाढताना दिसतो.

इथे पळशीकर त्यांच्या पुस्तकात राजकारणबद्दल लिहितांना म्हणतात, "राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे नव्हे; राजकारण म्हणजे समाजातील विविध समूहांचे हितसंबंध, संघर्ष, समन्वय आणि सार्वजनिक संसाधनांचे वाटप यांची प्रक्रिया आहे. राजकारण हे सार्वजनिक जीवनाचे केंद्र आहे. त्यामुळे राजकारणापासून दूर पळणे म्हणजे लोकशाहीपासून दूर जाणे होय."

भारतीय संविधानाचा उल्लेख करताना पळशीकर लिहितात, "भारतीय संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे." ते पुढे म्हणतात की भारतीय संविधानाचा प्रारंभच “We, the People of India…” या वाक्याने होतो. याचाच अर्थ सत्ता राज्याची नाही, तर जनतेची आहे. संविधानाने भारताला केवळ शासनपद्धती दिलेली नाही, तर एक मूल्यव्यवस्थासुद्धा दिली आहे.

आजच्या काळात “बहुमत म्हणजेच लोकशाही” हा चुकीचा व धोकादायक समज वाढताना दिसत आहे. याबद्दल सांगताना लेखक म्हणतात की लोकशाही ही केवळ बहुमताची सत्ता नाही; ती बहुमताला मर्यादा घालणारी संविधानिक चौकट आहे. या अर्थाने राजकारण जिज्ञासा हे पुस्तक लोकशाहीकडे संविधानिक दृष्टिकोनातून आपल्याला बघायला सांगते. 

हे पुस्तक आपल्याला सांगते की या देशाचा नागरिक केवळ मतदार नसून तो संविधानिक अधिकारांचा धारक आहे. त्याला भारतीय संविधानाने  मूलभूत हक्क दिले आहेत. समानतेचा अधिकार (कलम 14), अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम 19), जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 21), धार्मिक स्वातंत्र्य (कलम 25), ही काही उदाहरणे आहेत. याचाच अर्थ असा आहे की कोणत्याही राजकीय वातावरणात नागरिकत्वाला निष्ठा,ओळख, धर्म किंवा राष्ट्रवाद यांच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करू नये.

यासाठी CAA/NRC सारख्या विधेयकावर चर्चां करताना प्रत्येक नागरिकाने त्यातील राजकारण समजून घेतांना स्वतःचे संविधानिक अस्तित्व समजून घेणे फार गरजेचे आहे. म्हणून या पुस्तकातील पळशीकरांचे लेखन नागरिकाला हा प्रश्न विचारायला लावते की तो केवळ प्रेक्षक आहे, का संविधानाचा सक्रिय घटक?.

हे पुस्तक लोकशाही संस्थांचे महत्व काय आहे याचा उल्लेख करते. इथे लेखक म्हणतात की लोकशाही टिकते ती संस्थांवर. संसद, न्यायपालिका, निवडणूक आयोग, माध्यमे आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. म्हणून लेखकांच्या वैचारिक योगदानात संस्थात्मक संतुलनाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ सत्ता बदल नव्हे, तर सत्तेवर नियंत्रण ठेवणारी संस्थात्मक चौकट आहे. संस्था कमजोर झाल्या, तर लोकशाहीचा आत्मा संकटात येतो.

पळशीकरांचे लेखन या संकल्पनांचे विश्लेषण करून वाचकाला राजकीय भाषेच्या पलीकडे पाहायला शिकवते. लोकशाही टिकवण्यासाठी विवेकपूर्ण चर्चा आवश्यक असते, आणि ती चर्चा संकल्पनांच्या स्पष्टतेवर उभी असते. याचाच अर्थ असा की हे पुस्तक नागरिकाला हीच जाणीव करून देते की लोकशाही म्हणजे सरकारचे काम नाही; ती नागरिकांची जबाबदारी आहे.

समकालीन भारतात लोकशाही, संविधान आणि नागरिकत्व यांचे प्रश्न अधिक तीव्र झालेले आढळतात. अशा वेळी राजकारण समजून घेणे म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर संविधानिक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका समजून घेणे जरुरीचे आहे.

सुहास पळशीकर यांचे राजकारण जिज्ञासा हे पुस्तक लोकशाहीकडे चिकित्सक, संविधानिक आणि विवेकपूर्ण नजरेने पाहण्याची जिज्ञासा निर्माण करते. म्हणूनच लोकशाही समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक नुसते उपयुक्त नसून, ते अत्यावश्यक आहे आणि जरूर वाचले गेले पाहिजे.

धन्यवाद 
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...