Skip to main content

Pustake aani Manase पुस्तके आणि माणसे


विषय : पुस्तके आणि माणसे

शब्दांकन:  योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

आज सर्व समाजाचे एवढे ध्रुवीकरण झाले आहे की माणसा माणसांमध्ये वैमनस्य वाढताना दिसत आहे. त्यामुळे माणसांमधील माणुसकी संपत आहे का ? असे सतत वाटत आहे. हे किती काळ चालू राहील याचा अंदाज येत नसल्यामुळे मन खूप अस्वस्थ होत आहे. अशा वेळेस दोनच गोष्टी माणसाच्या मनाला या अस्वस्थेमधून बाहेर काढू शकतात असे मला वाटते. त्या दोन गोष्टी म्हणजे माणसाने निर्माण केलेला त्याचा बगीचा आणि स्वतःच्या मेहनतीने उभे  केलेले स्वतःचे वाचनालय. या दोनच गोष्टी माणसाला त्याची माणुसकी जिवंत ठेवण्यास मदत करीत राहतात आणि त्यात पुस्तकाचा उपयोग जास्त होतो. कारण या अविवेकी वातावरणात पुस्तकेच माणसाचा हरवलेला विवेक त्याला परत देवू शकतात आणि त्याला वैचारिक दृष्ट्या सक्षम बनवत असतात, त्याला जगण्यासाठी आधार देतात आणि माणसाचे आयुष्य समृद्ध करतात.

पुस्तकामधून माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. त्यात कादंबऱ्या, कथा, ललित, नाटकं, वैचारिक, भाषांतरीत व रुपांतरीत असे अनेक प्रकारचे साहित्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असते. भौतिकदृष्ट्या ते शब्दांमध्ये लिहिलेले असले तरी, हे शब्द मानवी मनाच्या कल्पनेतच जिवंत होत असतात. या शब्दातून निर्माण झालेल्या मजकुराचा जटीलपणा किंवा साधेपणा समजून घेण्याची क्षमता मानवी समाजाला इतर मानवी समाजांचा दृष्टीकोन समजून घेण्यास मदत करत असते. माणसाचा हा प्रवास पुस्तकांच्या पानांमध्ये कोरलेला असतो त्यामुळे जीवनातील अनेक अनुभवाबद्दल ही पाने बोलत असतात आणि जीवनाशी निगडीत असलेली नवीन तत्वे मांडीत असतात.

लहानपणापासून अनेक माणसांना पुस्तकरुपी लिहिलेल्या साहित्याचा परिचय होत असतो. हे साहित्य खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी त्यात विज्ञान कथा असतात तर कधी गूढ कथांचा संग्रह असतो. कादंबरी किंवा नाटकेसुद्धा साहित्य जत्रेतील महत्वाच्या गोष्टी आहेत. माणसाच्या लहानपणापासून सुरु झालेला पुस्तक वाचनाचा हा प्रवास मोठेपणी स्वतःच्या आवडीच्या विषयांचा शोध घेत साहित्याचे खरे महत्व समजून घेण्यास मदत करीत असतो. याचाच अर्थ असा की माणसांचे गुंतागुंतीचे जग मनापासून समजून घेण्यासाठी मानवाला पुस्तकच मदत करू शकते. लिहिलेल्या पुस्तकांमध्ये नैतिक शिक्षणाचे हेतू असतात. त्यात मानवी स्वभावाचे चांगले किंवा वाईट प्रतिबिंब पडलेले असते. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी नक्कीच होऊ शकतो. मात्र याचा अर्थ असा नव्हे की पुस्तके माणसाला केवळ मानवी जीवनाचे प्रतिबिंबच दाखवते, तर वाचकाला चांगला निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक सुद्धा ठरू शकते.

आजच्या इतके गोंधळलेले व आव्हानात्मक आणि सतत बदलणारे जग कधीच नव्हते. त्यामुळे आज पूर्वी इतके माणसाच्या व्यवहारी जीवनाचे अंदाज बांधणे सोपे नाही. म्हणूनच आज साहित्याला फार मोठे महत्व आहे कारण मानवी मन आणि त्याच्या सभोवतालच्या जगाच्या आकलनाचे अंदाज ग्रंथरुपात विस्तारलेले असतात. काय योग्य आणि काय अयोग्य या गोष्टीं पुस्तकी रुपात परिभाषित केली जाते. याचाच अर्थ पुस्तके माणसाला प्रेरक सामग्री देवून वाचकांना प्रोत्साहन तर देत असतातच पण वाचकाला आत्म-चिंतन करून इतरांना समजून घेण्यासाठी खूप मदत करून मानवी नातेसंबंध जोडण्याची क्षमता निर्माण करीत असतात.

इतिहास, विज्ञान, संगीत, खेळ, मनोरंजन, तत्वज्ञान, वगैरे अनेक विषयांची माहिती माणसाला पुस्तक स्वरूपात मिळत असतात. त्यामुळे माणूस नवी कल्पना आणि विचार प्रक्रीयेंशी परिचित होत जातो. सतत वाचनामुळे माणसाला माहिती तर मिळतेच पण त्या माहितीची आकलन करण्याच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होते. त्याशिवाय संवाद कौशल्य आणि शब्द भांडार वाढविण्यास मदत होते. त्यातून चांगले लेखन होण्यास मदत होत असते. पुस्तकांच्या सहवासात राहिल्यामुळे मेंदूला चालना मिळून संज्ञात्मक कार्य सुधारते आणि दैनंदिन जीवनाच्या ताणतणावांपासून मुक्त होण्यासाठी मदत होते. त्याप्रमाणे पुस्तक वाचन दीर्घकाळ केल्यामुळे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत वाढ होत जाते.

पुस्तके तुम्हाला एकाच ठिकाणी बसवून वेगवेगळ्या प्रदेशात फिरवून आणतात आणि वास्तविकता पर्यंत पोहोचवतात. वाचन हा सतत शिकण्याचा आणि आत्मशोधाचा न थांबणारा प्रवास आहे. माणसाच्या वयाशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यात नेहमीच काहीतरी नवीन असते. म्हणून पुस्तक वाचन हे मानवी जीवनाचे महत्वाचे अंग आहे कारण पुस्तक अनेक विषयांचा खजिना देतात आणि इतरांशी चर्चा करण्यासाठी माणसाला समृद्ध करीत असतात. यासाठी पुस्तके वाचलीच पाहिजे. इथे मला सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार Daniel J Boorstin यांचे एक वाक्य आठवते. ते म्हणतात,”A person who does not read is only half-alive. And if the members of a society stop reading?, Then you have a half-alive society.”

यासाठीच पुस्तके माणसाच्या जीवनातला महत्वाचा भाग असायला पाहिजे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर  

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...