रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८४ विषय क्रमांक : ४ विषय : महाराष्ट्र माझा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : १ मे १९६० रोजी भारताच्या पश्चिमी भागात मराठी भाषेचे सुंदर राज्य महाराष्ट्र या नावाने निर्माण झाले. तसे बघायला गेलं तर महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून सुंदर प्रदेश होता. १ मे १९६० रोजी त्याने आपले नवीन रूप धारण केले. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा असे अनेक मराठी प्रांत एकत्र येऊन मराठी भाषेचे राज्य निर्माण केले आणि आपल्या सामर्थांनी मराठी संस्कृती भारताच्या कानाकोपऱ्यात तर नेली तशीच भारताबाहेरसुद्धा पोहचविली. भारतात वेगवेगळ्या भाषांची राज्ये आहेत. ती सर्व राज्ये त्या भागातील भाषिकांना त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. तसाच महाराष्ट्रसुद्धा आम्हा मराठी भाषिकांना प्राणापेक्षा खूप प्रिय आहे. याचे समर्थन करताना आचार्य अत्रे म्हणतात, " महाराष्ट्र हे आमच्या भाषाप्रदेशाचे आणि भाषिक राज्याचे अभूतपूर्व नाव आहे ! त्या नावातच केवढा अभिमान, केवढे आव्हान आणि केवढी भावना भरलेली आहे. नुसतें ना...