Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

Ambhi Susanskrut? आम्ही सुसंस्कृत? (टीकात्मक लेख)

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १७१ विषय क्रमांक : ४ विषय : आम्ही सुसंस्कृत? (टीकात्मक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : खरोखर आपण सुसंस्कृत आहोत का? असा प्रश्न जेव्हा कुणी विचारतात तेव्हा आपण सहजपणे हो म्हणून उत्तर देत असतो. अशा वेळेस आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेतो त्यावेळीस आपण सहजपणे सुसंस्कृत या  शब्दाचा अर्थ शिक्षित किंवा श्रीमंत असा लावत असतो. एखादी व्यक्ती सुसंस्कृत ठरविताना आपण फक्त त्या व्यक्तीचे शिक्षण, त्याची मातृभाषेप्रमाणे इंग्रजी भाषेवर असलेली पकड, त्याची बँकेतील ठेवी, ती व्यक्ती वापरत असलेले महागडे डिझायनर कपडे, त्याच्याकडे असलेली संपत्ती इत्यादी गोष्टी लक्षात घेतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जरी सुसंस्कृत हा शब्द शिक्षणाशी संबंधित असला तरी सुसंस्कृत असणे म्हणजे श्रीमंत होणे नाही. श्रीमंत लोक व्यवस्थितपणे शिक्षण घेऊन सुसंस्कृत होऊ शकतात पण महागाड्या वस्तू विकत घेण्याची क्षमता कोणालाही सुसंस्कृत बनवत नाही. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला सुसंस्कृत म्हणतो तेव्हा आपल्याला हे जाणवते की त्याच्याकडे चांगले शिक्षण आहे, चांगले ...

Pravah प्रवाह : जुन्या पिढीने स्वीकारलेली नवीन पिढीची व्याख्या किंवा पद्धती

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १७० विषय क्रमांक : ५ विषय : प्रवाह : जुन्या पिढीने स्वीकारलेली नवीन पिढीची व्याख्या किंवा पद्धती   संकेतस्थळ : असं म्हटलं जातं की प्रत्येक जुनी पिढी आपला वारसा नवीन पिढीच्या हवाली करीत असते. त्यामुळे नवीन पिढीला नेहमी आपल्या पूर्वजांचे स्मरण होत राहते आणि त्यांच्या अस्तित्वाशी जुन्या पिढीशी नातेही जोडले जाते. तरीसुद्धा जुन्या पिढीची आणि नव्या पिढीची विचारसरणी खूप वेगळी असल्याचे जाणवते. याला अनेक कारणे असतात. त्यापैकी महत्वाची कारणे म्हणजे   प्रत्येक पिढीचा दृष्टीकोन , त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी मानलेली मुल्यात्मकता. बऱ्याचवेळा असे दिसून येते की जुन्या पिढीला नव्या पिढीच्या आधुनिकतेत रमता येत नाही आणि त्यांना आपल्या भूतकाळात निर्माण झालेल्या गोष्टींबद्दल आदर्श वाटत असतो. सतत भूतकाळातील गोष्टींचे स्मरण करीत असल्यामुळे नवीन गोष्टींचा स्वीकार करावयाला जुनी पिढी तयार असत नाही. काही रूढी , परंपरा आणि प्रथा जरी हानिकारक नसल्या तरी त्या निरूपद्रवी असतात , त्या सोडून दिल्या पाहिजे असा विचार जुनी पिढी पुष्कळदा करायला तयार नसते. त्यामु...

Rasgrahtnamk Vishleshan रसग्रहणात्मक विश्लेषण पुस्तक राब लेखक अनंत मनोहर

  रसग्रहणात्मक विश्लेषण पुस्तकाचे नाव : राब लेखक : अनंत मनोहर शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई   संकेत स्थळ ; अनंत मनोहर हे मराठी साहित्याच्या क्षेत्रातील विविध साहित्यप्रकार हाताळणारे एक बहुआयमी व्यक्तिमत्व. कथा , कादंबरी , ललित लेखन , प्रवास वर्णन , चरित्र लेखन असे साहित्य प्रकार त्यांनी आपल्या लिखाणातून वाचकापर्यंत पोहचवले आहे. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आणि त्या खेळावर सुद्धा त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे. वाटचाल ही त्यांची पहिली कादंबरी जी त्यांनी १९६४ रोजी लिहिली. त्यानंतर त्यांनी जवळपास २० कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे ६५ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. १९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विश्लेषण करणारे लेख त्यांनी दैनिक सकाळ मधून लिहिले आहे. सुनील गावस्कर यांचे चरित्र त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या चरित्राचा अनुवाद सुद्धा त्यांनी केला आहे. एम. ए. झाल्यावर ते बेळगावच्या राणी पार्वती कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यावेळी त्यांनी बेळगावच्या तरुण भारत या वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले आणि बेळगाव...

KAJAWA काजवा (कथा)

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १६९ विषय क्रमांक : १ विषय : काजवा (कथा) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :.  उद्याच्या वर्तमानपत्रासाठी लेख पूर्ण करून शेखर साळुंकेने तो परत एकदा वाचून काढला आणि  तो लेख आपल्या वर्तमानपत्राच्या संपादकीय कार्यालयात मेलद्वारे पाठवून दिला. या लेखात त्याने एका मोठया राजकीय सामाजिक अशा नेत्यावर टीकात्मक लेखन केले होते. लेख प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर नको ती संकटे येण्याची शक्यता होती. तसे बघायला गेलं तर अशा प्रकारची संकटे त्याने बऱ्याचवेळा अजमावली आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. दर वेळी जेव्हा संकटे आली तेव्हा त्याचे मित्रमंडळ, त्यांच्याबरोबर काम करणारी इतर पत्रकार आणि वृत्तपत्राचे संपादक अशी सर्व मंडळी त्याच्याबरोबर होती. या वेळीस इतर कोणीही त्याच्या बरोबर असण्याची शक्यता नव्हती. कारण त्याने आज अशा व्यक्तीबद्दल लिहिले होते जी व्यक्ती त्या सर्वांची खूप आदरणीय होती. तेव्हा अशा व्यक्ती बद्दल लिहिणे त्याला महागात पडू शकत होते. त्याची उपसंपादक पदाची नोकरीसुद्धा जाऊ शकत होती. पण शेखरला अशा आदरणीय व्यक्तीचा त्रास होत...

Mee Maza Margdarshak -मी माझा \ माझी मार्गदर्शक

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १६८ विषय क्रमांक : ५ विषय : मी माझा \ माझी मार्गदर्शक शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई काही माणसांची व्यक्तिमत्वे इतकी प्रभावी असतात की त्यांच्या सहवासातून प्रत्येकाला सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळत असते. अशा प्रभावी माणसांच्या किंवा व्यक्तिमत्वांचा शिकवणुकीमुळे प्रत्येक माणूस आपले जीवन घडवू पाहत असतो. पण माणसाला स्वतःचा आंतरिक मार्ग माहीत नसेल तर अशा व्यक्तिमत्त्वांनी कितीही शिकवण दिली किंवा लिखाण केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. याचे कारण म्हणजे माणसाच्या मनावर व शरीरावर होणारा भौतिक गोष्टींचा परिणाम. आपले आयुष्य कसे जगावे याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला असते. त्यासाठी मानव आपल्याला हवी असलेल्या साधनांची निवड करीत असतो आणि ही निवड करताना त्याचा संबंध भूतकाळाशी जरी नसला तरी त्याचे भविष्य घडविण्यासाठी जरूर असतो. कारण त्यात यश आणि अपयश अशा दोन्ही गोष्टी लपलेल्या असतात. आपण निवडलेल्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला खुपच संघर्ष करावा लागतो. मग माणसांच्या विचारांवर  सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांचा पगडा पडू लाग...