Skip to main content

Asambhav Short story -असंभव(कथा)

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : 131

विषय क्रमांक : 4

विषय : असंभव(कथा)

दिनांक : 24/04/2021

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता : माहीम, मुंबई

मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये गेली पाच वर्षे प्रथमेश ऑडिट विभागात काम करीत आहे. दरवर्षी दोनदा तरी कंपनीच्या इतर भागात कार्यरत असलेल्या शाखेत जाऊन ऑडिट करणे आणि त्याचा वृत्तांत कंपनीच्या वरिष्ठाना देणे हा त्याच्या कार्याचा भाग आहे. त्याप्रमाणे यावेळेस तो छत्तीसगड या राज्यात जाऊन तिकडे कार्यरत असलेल्या शाखांचे ऑडिट करणार होता. त्याची सुरुवात तो बिलासपूर या शहरापासून करणार होता. त्यासाठी मुंबई बिलासपूर रेल्वेने प्रवास करण्यासाठी त्याने मुंबई वरून सकाळी सहा वाजता सुटणारी गीतांजली एक्सप्रेस या ट्रेनचे तिकीट काढले पण ती गाडी बिलासपूरला मध्यरात्री सव्वादोन वाजता पोचत असे. इतर कोणत्याही गाडीचे तिकीट मिळाले नसल्यामुळे त्याला याच गाडीने प्रवास करणे जरुरीचे होते. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की एवढ्या मध्यरात्री आपण त्या गावी पोहचल्यावर गावाकडे जाण्यासाठी काही वाहन मिळेल का? मग मनाची तयारी करून त्याने ठरवले की जर वाहन नाही मिळाले तर रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहात थांबू आणि मग सकाळी रिक्षा मिळाली की आपण ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊ.

त्याप्रमाणे  प्रथमेशने सकाळी सहा वाजता मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावरून गीतांजली एक्सप्रेस पकडली आणि आपल्या दुसऱ्या दर्जाच्या वातानुकूलीत  डब्ब्यामध्ये स्थिरस्थावर होऊन पुस्तक काढून वाचू लागला. रात्री दोनपर्यंत त्यास आराम होता. गाडी सुरु झाली एकेक स्थानके मागे पडू लागली आणि रात्री आठ वाजता गाडी नागपूर स्थानकात पोहचली. नागपूर सोडल्यानंतर प्रथमेशने रात्रीचे जेवण पूर्ण केले आणि गाडीमध्ये असलेल्या परिचरला बिलासपूर येण्याच्या एक तास अगोदर उठवायला सांगितले आणि तो झोपून गेला. त्याप्रमाणे परिचरने त्याला उठवले आणि सर्व सामानाची आवराआवर करून तो बिलासपूर येण्याची वाट पाहत होता. बिलासपूर रात्री अडीच वाजता आले आणि गाडीतून उतरून तो बाहेर पडण्यासाठी असलेल्या गेटपाशी आला. बिलासपूर स्थानकावर तशी काहीच गर्दी नव्हती. जी माणसे उतरली होती ती त्यांच्या स्वतःच्या कारमधून निघून गेली होती. तिकीटचेकरला तिकीट दाखवून तो बाहेर आला पण त्याला गावात हॉटेल मध्ये जाण्यासाठी एकही वाहन दिसत नव्हते. तिकीटचेकरला विचारून तो रेल्वे स्थानकातील विश्रांतीगृहाकडे जाऊ लागला, तेव्हा त्याला एक व्यक्ती त्याच्याकडे येत असलेली दिसली. तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे न पाहता प्रथमेश विश्रांतीगृहात गेला. विश्रांतीगृहात तेव्हा कोणीही नव्हते. आपले सामान खाली ठेवून तो शांतपणे आपल्या मोबाईलवर आलेले मेसेजेस वाचत होता. ते वाचत असताना त्याला आपल्या बाजूला कोणीतरी बसल्याचा भास झाला म्हणून त्याने तिकडे बघितल्यावर त्याला जाणवले की मगाशी जी व्यक्ती त्याच्या दिशेने येताना दिसली होती तीच व्यक्ती त्याच्या बाजूला बसली होती.

त्या व्यक्तीने प्रथमेशकडे पाहून स्मित केले आणि नंतर नमस्कार करून त्याच्याशी हिंदी भाषेतून संवाद साधायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने आपला परिचय करताना सांगितले की त्याचे नाव आहे ऋषिकेश उगेमुगे. मग तो पुढे सांगू लागला की मै इधर बिलासपूर मै रहता हूं | आज मेरा परिवार नागपूरसे आनेवाला है, इसलिये मै उनको लेने आया था | इधर स्टेशन मे आने के बाद मुझे पता चला उनकी ट्रेन चार घंटे लेट हो चुकी है | यहासे मेरा घर दूर है, इसलिये मै इधर रुक गया | आप को कोई दिक्कत नही तो इधर बैठ जाता हूं | हे ऐकल्यावर प्रथमेशने त्यास बसण्यास सांगितले आणि स्वतःचा परिचय करून दिला. मै  मुंबईसे  आया हूं और मेरा नाम है प्रथमेश कुलकर्णी है. तेव्हा त्या व्यक्तीने प्रथमेशला विचारले की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? प्रथमेशने हो सांगताच त्यांचा संवाद मराठीतून सुरु झाला. हृषीकेश उगेमुगेने त्यांस सांगितले की ते नागपूरचे. ते बँकेत कामाला असून त्यांची बदली बिलासपूरला झाली. सुरुवातीला ते एकटे आले आणि आता त्यांचे कुटुंबीयसुद्धा येत आहेत. एवढ्या दूरवर हिंदी प्रांतात एक मराठीतून बोलणारी व्यक्ती भेटली म्हणून प्रथमेशला खूप आनंद झाला आणि त्याने ऋषिकेश उगेमुगेशी संवाद सुरु केला.

ऋषिकेश उगेमुगे त्यास सांगू लागले की ते नागपूरचे. त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्यांना दोन मोठया बहिणी असून एक धाकटा भाऊ आहे. आर्थिक परिस्थिती जरी चांगली नसली तरी त्यांच्या वडिलांनी खूप मेहनत घेहून सर्व मुलांना शिकविले आणि दोन बहिणींचे लग्ने लावून दिली. आता एक बहीण अमरावतीत असते तर दुसरी वाशीममध्ये. मी स्वतः फायनान्स घेऊन MBA केले आणि बँकेमध्ये नोकरी करू लागलो. नागपूरमध्ये ते म्हणजे ऋषिकेश, त्यांचे आई वडील, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले असे एकत्र राहत असून त्यांचा धाकटा भाऊ नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाला. आता आम्ही सर्वजण सुखी असून आनंदात आहोत असे त्यांनी प्रथमेशला सांगितले. एक वर्षापूर्वी त्यांची बदली बिलासपूरला झाली आणि मी इथे आलो. आता माझा परिवार सुद्धा येत आहे. त्यानंतर प्रथमेशने स्वतःचा परिचय करून दिला. तो मुंबईला फोर्ट मध्ये काम करीत असून बोरिवली येथे राहतो. त्याच्या बरोबर त्याचे आईवडील असतात आणि तो अजून  अविवाहित आहे असे सांगितले. दोघे एकमेकांशी बोलत असताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही आणि बाहेर सायकल रिक्षावाल्यांची गडबड सुरु झाल्याची जाणीव होऊ लागली. मग प्रथमेशने त्यांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला आणि आपले सामान घेऊन बाहेर जाण्याऱ्या गेटकडे चालू लागला. ऋषिकेशसुद्धा त्याबरोबर चालू लागले आणि त्यास म्हणाले बाहेर सिगारेट मिळेल का बघतो. तेव्हा प्रथमेशने त्यांना त्याच्याकडे असलेली सिगारेट देऊ केली पण सिगरेटचा ब्रँड माझा वेगळा आहे असे त्याने सांगितले. त्यास त्यांनी होकार दिला आणि गेटच्या बाहेर येऊन दोघांनी सिगारेट्स ओढल्या.

मग सायकल रिक्षा करून प्रथमेश ठरलेल्या हॉटेलमध्ये आला. हॉटेलमध्ये रूम मिळाल्यावर मस्त झोप काढून फ्रेश होऊन प्रथमेश ऑफिसमध्ये गेला. दिवसभर बिलासपूर शाखेचे काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास रायपूरला जाणे भाग होते. बिलासपूर शाखेतील सर्व कामे  दुपारी तीन वाजेपर्यंत त्याने संपवली  आणि सर्व लागणारी कागदपत्रे एकत्र करून आपल्या बॅगेत व्यवस्थित ठेऊन तो त्या शाखेतील काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याबरोबर दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडला. ऑफिसच्या बाहेर जात असताना त्याची नजर शाखेमध्ये ठेवलेल्या एका वर्तमानपत्राकडे गेली. त्यात त्याला काल मध्यरात्री भेटलेल्या ऋषिकेश उगेमुगेचा फोटो दिसला म्हणून त्याने ते वर्तमानपत्र उचलले आणि वाचू लागला. त्यात बातमी होती. SBT बँक के प्रबंधक ऋषिकेश उगेमुगे कि कार दुर्घटना मे मौत! मग प्रथमेशने त्या वृत्तपत्राची दिनांक पहिली तर ती मागील आठवड्याची होती. ही बातमी वाचल्यावर प्रथमेशने त्याच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्याला या बातमी बद्दल विचारले. तेव्हा त्याने  सांगितल्यावर प्रथमेशला त्याच्या  पायाखालची जमीन सरकत असल्याचा भास झाला. त्याच्या सहकाऱ्याने सांगितले की ऋषिकेश उगेमुगे इथे असलेल्या SBT बँकेचा शाखा प्रबंधक होता. सुरुवातीला तो एकटा इथे आला. मागावून त्याने आपल्या कुटुंबियांना बोलवून घेतले पण त्याचे सर्व कुटुंबीय बिलासपूर येण्या अगोदर मोठया रेल्वे अपघातात मरण पावले. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे ऋषिकेश उगेमुगे दारू पिऊ  लागले आणि एक दिवस नशेत गाडी चालवत असताना त्यांची गाडी समोरच्या ट्रकला आपटली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट बरोबर एक आठवड्यापूर्वी घडली होती.

हे सर्व ऐकल्यानंतर प्रथमेश खूपच हादरला. कसेबसे जेवण संपवून तो आपल्या सहकाऱ्याबरोबर परत ऑफिसमध्ये आला आणि काल घडलेला प्रसंग त्याने आपल्या सहकाऱ्याला सांगितला. तेव्हा त्याने प्रथमेशला हा प्रकार असंभव असल्याचे सांगितले आणि कुणाकडे न बोलण्यास सांगितले. प्रथमेशने मान्य केले. मग पूर्ण रात्र तो विचार करत घालवली. दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन रायपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसला तरीसुद्धा काल घडलेला प्रसंग खरा होता हे जरी कोणास सांगितले तर लोक त्यास वेड्यात काढतील म्हणून त्याने गप्प राहण्याचे ठरवले. रायपूरला हॉटेलमध्ये आल्यावर एक सिगरेट पेटवली आणि काल रात्री घडलेला असंभव प्रकार आठवू लागला. मग त्याने या प्रसंगाची कुठेही वाच्यता न करता, तो प्रकार  पूर्णपणे लिहून काढला आणि त्यास नाव दिले असंभव. 

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...