रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १६२ विषय क्रमांक : १ विषय : आधी केलेची पाहिजे शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : केल्याने होत आहे रे | आधी केलेची पाहिजे || यत्न तो देव जाणावा | अंतरी धरिता बरे || या ओळी आहेत संत रामदास स्वामींच्या. ते सांगतात कोणतीही व्यक्ती त्यांचे ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतात पण त्यासाठी आधी त्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. काम करणे म्हणजेच परमेश्वराला प्रसन्न करणे हे आपल्याला मनात बिंबवले पाहिजे. आपला आळस झटकून टाकला पाहिजे. जर आपण कर्म करत राहिलो तर ते कर्म आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जाते आणि त्यातच आपल्याला परमेश्वर दिसू लागतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात कर्माला फार महत्व आहे. जर माणसाने आपले आयुष्य कर्म न करता आळस करण्यात घालवीले तर त्याचे पुढील आयुष्य हे कष्टदायक किंवा त्रासदायक होऊ शकते. कोणतेही कर्म करताना अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. म्हणून कर्म न करता नुसते पडून राहणे हा काही त्यावरील उपाय नाही. अशा अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. त्यासाठी प्रथम कामाला सुरुवात केलीच पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने तर कर्मयोगा...