Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

Sanana Nave Thevane Yogya aahe kay?सणांना नावं ठेवणे योग्य आहे काय?

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०९ विषय क्रमांक : ४ विषय : सणांना नावं ठेवणे योग्य आहे काय? शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : भारत हा अनेक संस्कृतींचा देश आहे आणि आम्हाला या समृद्धी संस्कृतीचा अभिमान आहे. या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे आपले सण. मग ते सण कोणत्याही धर्माचे असो किंवा राष्ट्रीय सण असो, ते सण आपण दिमाखदार आणि भव्यतेने साजरे करीत असतो. मग त्यात दिवाळी किंवा होळी असो, ख्रिसमस किंवा ईद असो हे सर्व सण आपल्याला सर्वांना एकत्र आणतात आणि आपली ओळख मजबूत करण्यास मदत करतात. हे सर्व सण आपल्याला नेहमीच चांगला संदेश देत असतात. असे म्हणतात वैदिकांची यज्ञसंस्था म्हणजे सण आणि उत्सवच होते. याचाच अर्थ प्राचीन भारतात ऋग्वेदकालीसुद्धा सण साजरे करीत असले पाहिजे. याबाबतीत पश्चिमी वैदिक पंडित पिशेल म्हणतो ऋग्वेदामध्ये अत्यंत महत्वाचा असा सोमयाग हा लोकप्रिय उत्सव किंवा सण साजरा केला जात होता. या उत्सवात कवी कविता करीत म्हणजे ऋचा करीत असे आणि गवई या ऋचांच्या आधारे सामगायन करीत असे. यात नृत्यांगनांही आपली नृत्यकला सादर करीत असे. योद्ध्ये धनुष्यबाणाची अचूक लक्षवेध...

Kharach Apan Jagato ka? खरंच आपण जगतो का?

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०८ विषय क्रमांक : ४ विषय : खरंच आपण जगतो का? शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई  संकेत स्थळ : मानवी जीवन म्हणजे चिरंतन असे न सुटणारे एक कोडे आहे. कारण या जगात प्रत्येक गोष्ट अर्थ पूर्ण असते. या सुंदर विश्वात चांगलं असे काहीच नाही असे म्हणणाऱ्या माणसांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते. हे विश्व अनेक प्रकारच्या धनधान्यांनी भरलेले आहे. त्यातून आपण नेमके काय घ्यायचे आहे, हे प्रत्येकाने स्वतः ठरविले पाहिजे. सूर्य उगवल्यावर पशुपक्षी उत्साहाने बागडत आपला चारा शोधत असतात मग माणसाने सुद्धा त्याला निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टींपासून आनंद व्यक्त करण्यास काय हरकत आहे. या जगात अशी काही माणसे आहेत की ज्यांनी अनेक यातना भोगून सुद्धा फिनिक्स पक्ष्यासारख्या उंच भराऱ्या मारल्या आहेत. जेव्हा आपण अशा लोकांची चरित्र पुस्तकातून वाचतो तेव्हा आपल्याला एक वेगळीच प्रेरणा मिळत जाते. मग आपण एखादा छंद जोपासू लागतो. त्यामुळे नवीन विचारांची निर्मिती होऊ लागते. रुक्ष,अर्थहीन जीवन जगताना नेहमी निराशाजनक विचार येतात, तेव्हा हे नवीन विचार आपल्याला आनंद देत राहतात ...

Udyache Dadapan Yete उद्याचे दडपण येते

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०७ विषय क्रमांक : ४ विषय : उद्याचे दडपण येते शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई चार्ल्स डार्विनने माणसाच्या निर्मिती बद्दल लिहिताना म्हटले आहे की माणसाला कोणीही निर्माण केले नसून, तो निसर्गातून उत्क्रांत झाला आहे. तो स्वतःच स्वतःचा निर्माता असल्यामुळे त्याने केलेल्या प्रत्येक निर्मितीसाठी तोच जबाबदार असल्याचे सांगत डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. वास्तविकपणे पाहिले तर असे दिसून येईल की माणूस हा प्राणीसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहे. पुढे त्याने प्राणीसृष्टीतून  बाहेर येऊन स्वतःची अशी मानवी सृष्टी निर्माण केली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक रावसाहेब कसबे आपल्या 'धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह' या पुस्तकात म्हणतात, "निसर्गातील प्राणिसृष्टी पूर्णपणे तिला लाभलेल्या सहज प्रेरणांप्रमाणे निसर्गाशी संतुलित असे जीवन जगत असते. प्राण्यांचे संपूर्ण जीवन भूक, तहान, कामवासना आणि सुरक्षितता या सहजप्रेरणांनी नियंत्रित केलेले असते. परंतु माणूस त्यापेक्षा वेगळा असतो. तो प्राणीच होता हे खरे ; परंतु माणसाचा जन्म त्याच...