रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०१ विषय क्रमांक : ४ विषय : धुंद झाल्या कातरवेळी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : दिवे लागण्याची वेळ म्हणजे कातरवेळ असे लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो असतो. असे म्हणतात की सूर्य जेव्हा मावळत असतो त्यावेळेस कातर वेळ म्हटली जाते कारण ही वेळ आपल्या जीवाला कातर लावत असते. अनेक मित्र नातेवाईक जरी आपल्याभोवती असले तरी काही खास मित्रांची किंवा नात्यातील माणसांची आठवण या वेळेस प्रकर्षाने येत असते. अशा आठवणी आपल्याला दिव्याच्या मंद प्रकाशात अलगद प्रकारे येऊन आपले मन अंतरबाह्य ढवळून काढते. जेव्हा दिवस आणि रात्री एकमेकांना दुभागलेल्या असतात. यालाच आपण कातरवेळ म्हणत असतो. अशावेळेस आपण कोणत्यातरी उदास गोष्टींशी जोडत असतो. कारण मानवी मन नेहमीच असेच मानते की प्रकाश आपल्यात सकारात्मक भाव निर्माण करतो तर काळोख किंवा अंधार नेहमी उदासीनता निर्माण करतो. त्यामुळे कातरवेळी उदास वाटणे हे साहजिकच आहे. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सायंकाळी देवापुढे दिवे लावणे आणि छान सुगंध येणारी उदबत्ती लावण्याची जी प्रथा आहे ती आपल्या मन...