विषय :मोठेपणाला स्वप्ने हवी असतात द्वेष नव्हे. शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई आज भारत एका संक्रमण व्यवस्थेतून जात आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी भारतीय समाजालाच या भयानक व्यवस्थेतून बाहेर यावे लागेल. आजच्या भारतात विवेकी किंवा सुसंगत बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. कुठलीही गोष्ट कोणत्याही तत्वज्ञानाचा आधार न घेता किंवा कोणतेही पुरावे न देता चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे. भारतीय संविधानातील निधर्मीवाद, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोन या सर्व गोष्टींना तिलांजली दिली गेली आहे. समाजवाद, मुक्त्ततत्ववाद आणि विचार स्वातंत्र्य बाजूला सारून आजचा भारत धर्मांध आणि जातीयवादी होताना दिसत आहे. आज भारतीय समाजाचे घाणेरड्या पातळीवर जे ध्रुवीकरण होत असतानासुद्धा हा समाज काहीही न बोलता अविवेकीपणाने सर्व गोष्टींशी तडजोड करून समाधानी असल्याचे चित्र निर्माण होत आहे. हे फार भयानक आहे. अशा वेळेस प्रत्येक समाजात सर्व गोष्टींची चिकित्सक पद्धतीने मांडणी करणाऱ्या लोकांची गरज फार असते. आज भारतीय समाजात सांस्कृतिक ज्ञान संचीतेचे अध्ययन-अध्यापन करणारे कोणी दिसत नाही. जे कोणी स्वतः कडे अस...