Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख)

शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : २०९ विषय क्र. : ४ विषय : महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई परीक्षक : सौ सपनाताई फुलझेले नागपूर संकेतस्थळ: आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे कार्य एवढे व्यापक आहे की, त्याचा आढावा घेतल्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शतकानुशतके अंधकारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणत असत की, शिक्षणाचा उपयोग फक्त उदरनिर्वाहासाठी नसून गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि वैचारिक दृष्टीकोन वैज्ञानिक बनवण्यासाठी होतो. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी म्हटले आहे— “विद्येविना मती गेली | मतिविना नीती गेली || नीतीविना गती गेली | गतिविना वित्त गेले || वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||” या ओळींतून शिक्षणाशिवाय समाजाची होणारी दुरवस्था स्पष्ट होते. अशा या आधुनिक महात्मा फ...

सामाजिक बांधिलकी (वैचारिक लेख)

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : २०८ विषय क्र. : ४ विषय : सामाजिक बांधिलकी (वैचारिक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई परीक्षक : मा. माधुरीताई वानखडे, हिंगणघाट संकेतस्थळ : सामाजिक बांधिलकी हे केवळ शब्द नसून ती एक महत्त्वपूर्ण जीवनमूल्य आहे. ही मूल्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. आपल्या शेजाऱ्यांच्या सुख-दुःखात आपण कळत-नकळत सहभागी होतो, तेव्हा सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला होते. एखाद्याला मदत करणे, अपघात घडल्यास तात्काळ धावून जाणे, वादळ, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या लोकांना सहाय्य करणे, रक्तदान करणे या सर्व कृतींमधून आपण सामाजिक बांधिलकी जपत असतो. समाज बदलण्याची वाट पाहणारे अनेक असतात, पण बदल घडवणारे थोडेच असतात. म्हणूनच ‘सामाजिक बांधिलकी’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास ती ‘माणुसकी’ म्हणून ओळखता येईल; परंतु हा अर्थही अपूर्णच आहे. सामाजिक बांधिलकी ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, कारण मानव हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय माणसाचे अस्तित्व अपूर्ण आहे. समाजाकडून आपण ज्ञान, संस्कृती आ...